पुस्तकाबद्दल
सुहास कोळेकर या संवेदनशील मित्राने नागपूरच्या वास्तव्यात असे काही अनुभव घेतले. ज्येष्ठांची मुजोरशाही आणि प्रांतिक अहंगंडातून चालवलेली छळछावणी यामुळे ते खचले नाहीत. गरिबीच्या डोंगराला सुरुंग लावून भवितव्य घडवायचे तर सगळे हलाहल सहन करून स्वतःला सिद्ध करावे लागेल हे त्यांना परिस्थितीने शिकवले. त्यामुळे या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडत त्यांनी त्यांचे सामर्थ्य दाखवून दिले.
त्यांचे हे जीवनानुभव आपल्यालाही प्रतिकूलतेवर मात करण्यास बळ देतील. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील काही कटू-गोड आठवणी जाग्या करतील. वयाने चाळीशीच्या पुढील प्रत्येकाला पुन्हा एकदा ‘तरूण’ करणारे आणि तारूण्यात प्रवेश करणाऱ्यांना नवी उमेद, बळ देणारे हे ‘रॅगिंगचे दिवस’ आपण वाचनाच्या माध्यमातून अनुभवायलाच हवेत.
– घनश्याम पाटील
Nilesh Yadav –
Its mind blowing book and it is based on college life of every student gets past glimpse bottom of heart, everyone shold read this book who remembers college time.