₹ 250.00 Original price was: ₹ 250.00.₹ 200.00Current price is: ₹ 200.00.
आज जगाच्या पाठीवर भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश आहे. अशा तरुणांच्या देशातील मयूर बागुल नावाचा एखादा तरूण भोवतालचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी भोवताल पाहिला की त्यांना प्रश्न पडतात. त्या प्रश्नांच्या भोवतीचे चिंतन करत काही लिहावे वाटते आणि त्यातून सर्जकचा जन्म होतो. खरंतर प्रश्न पडणे हाच स्वतःला समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे. आपला भोवताल उघड्या डोळ्याने पाहिला तर मूलभूत प्रश्न देखील सुटलेले नाहीत, हे वास्तव समोर येते. त्याबद्दल बागूल अनेक ठिकाणी चिंता व्यक्त करतात.त्यांच्या लेखनातून समाजशास्त्रीय दृष्टीकोनही अनेक ठिकाणी प्रतिबिंबीत होतो. आपण सर्वांनी एकत्रित येत विकासाचा आलेख उंचवायला हवा ही अपेक्षा त्यांचे माणूसपणाचे दर्शन घडवते.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed