विनोबांची शिक्षणछाया

 250.00  200.00

या पुस्तकाचे शीर्षक आहे, ‘विनोबांची शिक्षणछाया!’ आता ‘छाया’ म्हटले की, गारवा आला. तळपत्या उन्हात, अंगाची काहीली होताना या गारव्याचे महत्त्व प्रकर्षाने पटते. आजची यंत्रणेची सगळी वाताहत पाहता या गारव्याची कधी नव्हे इतकी गरज सध्या आहे. आपल्या श्रेष्ठतम परंपरेतील आचार्य विनोबाजींसारख्या महनीय व्यक्तिमत्त्वाचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे. विनोबा म्हणतात, ‘‘एक दिवस मी उन्हात फिरत होतो. चहूकडे मोठमोठे हिरवे वृक्ष दिसत होते. मी विचार करू लागलो की वरून इतके कडक ऊन असताना हे वृक्ष हिरवेगार कसे? त्यावेळी लक्षात आले की, जे वृक्ष वरून इतके हिरवेगार दिसत आहेत त्यांची मूळे जमिनीत अति-खोल गेली आहेत आणि तेथून ते पाणी घेतात! याप्रमाणे आम्हाला आतून भक्तिचे पाणी आणि बाहेरून तपश्चर्येचे ऊन मिळाले तर आम्ही उंच वृक्षांप्रमाणे हिरवेगार होऊ!’’

Buy now Read more