शिक्षणावर बोलू काही

Original price was: ₹ 300.00.Current price is: ₹ 240.00.

बदलत्या शैक्षणिक धोरणांची चर्चा करताना ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि’ असे म्हणता येत नाही. नवं ते स्वीकारताना जुन्यातील चांगलं ते हवं, हेही संबधितांनी लक्षात घ्यायला हवं. शिक्षणामुळे ‘माहिती’ मिळत असताना ‘ज्ञान’ हरवत चालले आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी त्यांच्या लेखनातून ‘माणूस’ कसा घडेल? याचा विचार सातत्याने मांडले आहे. आचार्य विनोबा भावे, गिजूभाई बधेका ते जे. कृष्णमूर्ती बसा त्यांचा व्यापक पट आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

संदीप वाकचौरे हे मुळात शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी व्यापक आहे. गेल्या शंभर वर्षात शिक्षण क्षेत्रात जे बदल झाले, ज्यांनी हाडाची काडे करत निष्ठेने संस्था उभारल्या आणि नंतर नंतर या क्षेत्रातील सेवाभाव बाजूला पडून धंदा केला जाऊ लागला त्या सर्वाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे सामर्थ्य आणि मर्यादा याचे विवेचन करताना ते असंख्य दाखले देतात, उदाहरणे सांगतात, आकडेवारी मांडतात. त्यांच्या लेखणीला सत्याचा गंध असल्याने या क्षेत्राचा आरसा दाखविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत.

घनश्याम पाटील
लेखक, संपादक, प्रकाशक