पाळंमुळं

 400.00  320.00

कोणत्याही वृक्षाची पाळंमुळं जितकी खोल तितका तो वृक्ष भक्कमपणे वादळवाऱ्यात उभा असतो. माणसाच्या आयुष्याचंही तसंच आहे. त्याच्या जीवनसंस्काराची, विचारांची पाळंमुळं जितकी खोल तितका तो माणूस भक्कमपणे समाजव्यवस्थेत उभा असतो. अशी पाळंमुळं भक्कमपणे रुजवून समाज आणि शासन अशा दोन्ही व्यवस्थेमध्ये लेखकाने अत्यंत निरपेक्षतेने काम करत शासकीय सेवा पूर्ण केली.

नानासाहेब खर्डे यांचे ‘पाळंमुळं’ हे पुस्तक निश्चितच एका कालखंडाचा इतिहास दर्शित करणारे आहे. संस्कार होण्यासाठी परिस्थिती असावी लागते असे नाही. जगण्यासाठी दोन हात करताना देखील घरातील ज्येष्ठांनी पेरलेल्या संस्काराच्या शिदोरीवर मस्तकाचे भरण होते. माणसं अधिक घट्टपणे पाय रोऊन उभे असतात. तो संघर्ष जगण्यासाठी ताकद देणारा असतो. त्या संघर्षामुळे जीवन उन्नतीचा विशाल महामार्ग सहजपणे एखाद्याला सापडून जातो. नानासाहेब खर्डे हे त्यापैकी एक आहेत.

800 in stock

पुस्तकाबद्दल

संगमनेरसारख्या छोट्याशा गावातील एखादा तरुण शासकीय सेवेत येतो, शासनाची सेवा प्रामाणिकपणे बजावतो आणि आपण ज्या कुटुंबातून आलो आहोत, ज्या व्यवस्थेतून आलो आहोत त्यांच्याप्रति कृतज्ञेचा भाव व्यक्त करत सातत्याने प्रामाणिकपणाची कास धरतो. खर्डे हे आमच्या विभागातील असे एक अधिकारी आहेत ज्यांनी सतत समाज व शासन यांच्या हिताचा विचार केला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबर त्यातून अधिक अधिक समाजहित साधेल, त्यात राष्ट्रकल्याणाचा विचार असेल अशा संस्काराने हा माणूस कार्यरत राहिला.

त्यांनी शासकीय काम देखील गीतेतील संस्काराचा विचार करता कर्म म्हणूनच केले आहे. या पुस्तकामधील त्यांचा संघर्ष नव्या उमेदीने लढण्याची शक्ती देतो. जीवनामध्ये इप्रामाणिकपणाचे मूळ अधोरेखित करतो. जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य असे काहीच नाही हे सांगत वाचकांच्या मनात प्रेरणा निर्माण करतो. त्यामुळे हे पुस्तक जगण्याला उमेद देणारे, नव्या पिढीला संस्काराची शिदोरी देणारे, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्वांनाच उपयोगी पडणारे आहे.

– डॉ. इंजि. श्री. संजय बेलसरे

सचिव, जलसंपदा खाते, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अधिक माहिती

लेखक

नानासाहेब खर्डे

पाने

312

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाळंमुळं”

Your email address will not be published. Required fields are marked *