सुभावभजन

 350.00  175.00

‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्माण होण्यासाठी संतपदाला जावं लागतं. आजच्या काळात सर्व क्षेत्राची इतकी अधोगती झालीय की, कोणीही कुणावर पटकन विश्वास ठेवत नाही. सर्वच धर्मातील अनेक धर्मगुरुंनीही त्यांची विश्वासार्हता गमावली आहे. अशा परिस्थितीत ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण यांच्यासारखे कलियुगातील संत आकाशाचे खांब बनून समाजगाडा सुरळीत राहील याची दक्षता घेतात. कर्मकांडं किंवा बुवाबाजीच्या मागे न लागता विशुद्ध भावाने भजनात एकरूप होत समर्पित आयुष्य जगणार्‍या शांताराम महाराज अर्थात अण्णांची अमृतमहोत्सवी वाटचाल या गौरगग्रंथात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध मान्यवरांनी अत्यंत आत्मियतेने लिहिलेल्या या लेखातून वारकरी संप्रदायाची पताका आणखी डौलात फडकणार आहे. त्याचबरोबर आपल्या मनात प्रेरणेचे, मांगल्याचे, चैतन्याचे दीप प्रज्वलित होणार आहेत. त्यासाठीचे हे सुभावभजन!

978 in stock

पुस्तकाबद्दल

विटाळ तो परद्रव्य, परनारी
त्यापासूनि दुरी तो सोवळा
अशी ‘सोवळेपणा’ची नितांतसुंदर व्याख्या जगदगुरू संत तुकाराम महाराजांनी केलीय. तो निकष आजच्या काळात लावला तर परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच नैतिकता, चारित्र्य आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर शांताराममहाराज निम्हण यांच्यासारख्या महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.
सदा नामघोष करु हरिकथा
तेणे सदा चित्ता समाधान
असे संतवचन आहे. आयुष्यभर हा विचार मंत्र म्हणून जपणारे शांताराम महाराज आजच्या काळाचे खरे संत आहेत. आपण देव पाहिला नाही, तेवढे आपले भाग्य थोर नाही पण देवमाणूस पाहायचा असेल तर एकवेळ शांताराममहाराजांना नक्की भेटा.
त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या गौरवग्रंथाच्या माध्यमातून त्यांना वंदन करतो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आम्ही केलेला हा प्रयोग आपल्या पसंतीस उतरेल याची अपेक्षा बाळगतो.

– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक

अधिक माहिती

संपादक

घनश्याम पाटील

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुभावभजन”

Your email address will not be published. Required fields are marked *